भंगारच्या 24 लाखावरून आदिनाथच्या संचालक मंडळात खडा जंगी!!
व्यवहार मान्य नाही जमा खर्च करू नका, प्रशासकीय संचालक विलास घुमरे यांची भूमिका
करमाळा (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)
आदिनाथ कारखान्यातील बहुचर्चित भंगार घोटाळ्यांने आता वेगळ वळण घेतल असून यातील जमा केलेली रोख रक्कम 24 लाख रुपये कुठे गेली, याचा तपशील चिप अकाउंटंट सतीश पोळ देऊ न शकल्यामुळे हिशोब कसा दाखवायचा यावर प्रशासकीय मंडळ अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे व नवीन प्रशासकीय संचालकामध्ये वाद झाला.
31 मार्च अखेर हिशोब पूर्ण करण्यासाठी झालेल्या बैठकीत चीप अकाउंट सतीश पोळ यांनी माझ्याकडे प्रशासकीय संचालकांनी 24 लाख रुपये दिले व संचालकाच्या इशारानुसार ही रक्कम रोखीनी कारखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आली. मात्र, याचा हिशोब कागदावर आलेला नाही. आता तो जुळवावा लागेल तरच, हिशोब पूर्ण होईल, असे सतीश पोळ यांनी बैठकीत सांगितल्यानंतर प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे यांनी तुम्ही रोख पैसे घेतले कसे व त्याची विल्हेवाट कशी लावली, हा विषय आमचा नवीन संचालकांचा नसून यातील सत्य जनतेपुढे मांडा आम्ही बेकायदेशीर काम करणार नाही, असे ठामपणे सांगितले. या बैठकीत डॉ. वसंतराव पुंडे व संचालक देशमुख उपस्थित होते.
यावर मंडळ अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी मी ऑडिटर असून मला हिशोब कसा करायचा हे कळते, असे सांगून हा हिशोब कागदावर घेण्याचा आग्रह केला. नवीन प्रशासकीय तिन्ही संचालकांनी हा हिशोब कागदावर घेण्यास विरोध केला. यामुळे या भंगार विक्रीचा विषय पुन्हा आता पुराव्यानिशी चर्चेत आला आहे. आदिनाथ कारखान्याने ऊस वाहतूकदारांकडून येणे बाकी पोटी 18 ते 20 मोठी वाहने जप्त करून आणल्या होत्या व इतर काही भंगार कारखान्याच्या आवारात पडली होती. हे सर्व भंगार कोणतेही टेंडर प्रक्रिया न करता व कुठलेही कायदेशीर सोपस्कार न पाडता हे भंगार 50 लाख रुपयाला इंदापूर येथील व्यापाऱ्याला रातोरात विकले होते, असा आरोप आदिनाथचे माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे व मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी केला होता.
या व्यवहारानंतर माझ्या जीविताला धोका आहे, असे सांगत कारखान्याचे चिप अकाउंटंट सतीश पोळ व तत्कालीन कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी लेखी राजीनामा देऊन कारखाना सोडला होता. आता कालच्या बैठकीत थेट उघडपणे या भ्रष्टाचाराच्या 24 लाख रुपयांवर चर्चा झाल्यामुळे नेमका भ्रष्टाचार किती रुपयाचा झाला, यात कोणी कोणी पैसे खाल्ले, याची सविस्तर चर्चा तालुक्यात चालू आहे.
याबाबत प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे यांना विचारले असता ते म्हणाले की, कारखान्याचेअकाउंटंट सतीश पोळ यांनी 24 लाख रुपये कारखान्यात रोख आले असून ही रक्कम तत्कालीन संचालकांच्या इशाऱ्यावरच काही जणांना वाटण्यात आली आहे, आता याचा हिशोब जुळवायचा आहे. यामुळे हिशोब कागदावर घ्यावा लागेल ,अशी बैठकीत मागणी केल्यानंतर आम्ही याला तीव्र विरोध केला आहे.
हे 24 लाख रुपये कोणी आणले, कशासाठी आणले व कारखान्यात कशासाठी खर्च केले, याचा हिशोब प्रशासकीय मंडळ अध्यक्ष देतील, त्याचा आमचा काही संबंध नाही. दहा हजार रुपये पेक्षा जास्त व्यवहार असेल तर तो रोखीनी करता येत नाही अशी सहकार खात्यात तरतूद आहे. यामुळे हा व्यवहार आम्ही प्रोसिडिंगला घेण्यास विरोध केला आहे.
देवानंद बागल, सदस्य आदिनाथ बचाव समिती
कारखान्यातील भंगार सभासदांच्या परस्पर विकणे बेकायदेशीरपणे त्याची रक्कम घेणे व त्याची विल्हेवाट लावले याबाबत मी वारंवार तक्रारी केल्या होत्या. आज त्याला ठाम पुरावा मिळाला आहे. आता याप्रकरणी तो इंदापूरचा भंगारवाला व त्याच्याकडून जवळपास 45 लाख रुपये आणणारा कारखान्याचा प्रतिनिधी व संचालक याची चौकशी करावी. तत्कालीन चीप इंजिनियर शिंदे यांनी जुन्या मोटारी व जुन्या सामानाची खरेदी करून नवीन बीले कारखान्यात सादर केली आहेत. यामुळे या प्रकरणात प्रशासकीय मंडळ अध्यक्ष, संचालक, प्रशासकीय चीप अकाउंटंट या प्रकरणाशी संबंधित मच्छिंद्र ढवळे, सुंदर पोळ, चीप इंजिनियर शिंदे, तत्कालीन एमडी अरुण बागनवार, सिक्युरिटी ऑफिसर यांची चौकशी व्हावी.
बाळासाहेब बेंद्रे, प्रशासकीय मंडळाध्यक्ष आदिनाथ कारखाना
आदिनाथ कारखान्यामधून वाहतूकदारांच्या आलेल्या जुन्या ट्रका व इतर भंगार परस्पर विकून कारखान्यात रोख रक्कम जमा झाली, अशी माहिती कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अकाउंटंट विभागाने दिली. मात्र, या व्यवहाराबद्दल मला काही माहीत नाही. याबाबत तसे घडले असेल तर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक सिक्युरिटी ऑफिसर चीफ इंजिनियर व इतरांनी या प्रश्नाची उत्तरे द्यावीत.
चीफ अकाउंट पोळ यांनी हा विषय कधीही संचालक मंडळ बैठकीत सांगितला नाही. पोळ यांच्या सांगण्यानुसार भंगार विक्री व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे. आता याबाबत विद्यमान संचालक मंडळ काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.