![](http://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2023/12/download-1-2.jpeg)
मुंबई (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेती व्यवसायाला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. भारतात प्रत्येक राज्यात शेती हा प्रमूख व्यवसाय आहे. शेतीप्रधान भारतात २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची, शेती व्यवसायासमोरील आव्हानांची चर्चा केली जाते. शेतकरी दिवस कधीपासून साजरा करण्यात आला ? यामागचा इतिहास आज आपण जाणून घेवू.
कृषीप्रधान भारतात २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणजेच शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आपल्या कार्यकाळात चौधरी चरण सिंग यांनी शेतीव्यवसायासाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेती व्यवसायासाठी घेतलेल्या या निर्णयांमुळे, त्यांच्या काळात राबवलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.
चौधरी चरण सिंग यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ मध्ये एका शेतकरी कुटूंबात झाला. शेतकरी कुटूंबात जन्मल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या समस्यांची जाणीव होती. याच जाणीवेतून त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्या. त्यामुळेच ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. चौधरी चरण सिंग यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ मध्ये एका शेतकरी कुटूंबात झाला. शेतकरी कुटूंबात जन्मल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या समस्यांची जाणीव होती. याच जाणीवेतून त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्या. त्यामुळेच ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.
राष्ट्रीय किसान दिन म्हणजेच शेतकरी दिनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. विविध सरकारी योजनांची, शेतकरी हिताच्या निर्णयांची या दिवशी घोषणा केली जाते. तसेच विविध कार्यक्रमांमधून, स्पर्धा, व्याख्याने, इ.मधून शेतकरी आणि शेती व्यवसायाबद्दल जनजागृती केली जाते. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये विविध स्पर्धा आणि शेतकरी प्रदर्शनही भरवले जाते.